राजकीय द्वंद्व! उद्धव ठाकरे-नाना पटोले वाद, शरद पवारांनी घेतला 'हा' ठाम निर्णय
शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे यांनी पक्षाचं नाव मिळवलं. अजित पवार बंडखोरीतून महायुतीत आले. विधानसभा निवडणूकीत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावर वाद निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Nana Patole : शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला मूळ शिवसेना मानलं आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांना दिलं. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत महायुतीत आले. एकनाथ शिंदें यांच्यासह अजित पवारांनीही पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं. मात्र, लोकसभेच्या निकालात या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. जो निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक होता. तर, याउलट शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. आता विधानसभा निवडणूकीत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. शरद पवार जागा वाटप करुन शांत झाले आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींवर जितेंद्र आव्हाड यांनी थेट भाष्य केलं आहे.