मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन संजय राठोडांनी का धुडकावलं?

मुंबई तक

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं की, आपले सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करावेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला त्यांच्याच पक्षातील मंत्री संजय राठोड यांनी धुडकावून लावल्याचं आज पाहायला मिळालं आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं की, आपले सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करावेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला त्यांच्याच पक्षातील मंत्री संजय राठोड यांनी धुडकावून लावल्याचं आज पाहायला मिळालं आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षाने आरोप सुरु केले होते. जेव्हापासून या प्रकरणाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. अखेर आज (23 फेब्रुवारी) ते मीडियासमोर आले आणि त्यांनी आपली बाजू मांडली. पण असं करताना त्यांनी एक एकप्रकारे मोठं राजकीय शक्तीप्रदर्शनच केलं. ज्यावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

राज्यात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यातही अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने येथे अनेक निर्बंध लागू केले आहेत. अशावेळी संजय राठोड यांच्यासारख्या एका बड्या मंत्र्याने ज्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन केलं त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

1. गेले पंधरा दिवस अज्ञातवासात गेलेल्या संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन का धुडकावलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp