Independence Day: १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा केला जातो? काय आहे इतिहास? - Mumbai Tak - why is 15th august celebrated as independence day what is history - MumbaiTAK
बातम्या

Independence Day: १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं. त्यानंतर लाल किल्ला या राष्ट्रीय वास्तूवरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात शेकडो स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलं. स्वातंत्र्य […]

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं. त्यानंतर लाल किल्ला या राष्ट्रीय वास्तूवरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात शेकडो स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलं.

स्वातंत्र्य दिवसाचा इतिहास काय आहे?

भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांसह अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरू केलं. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश उभा राहिला पाहिजे हे स्वप्न या सगळ्यांनीच पाहिलं होतं. त्यातूनच ही स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. त्यानंतर इंग्रजांनी ही चळवळ हे आंदोलन मोडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले. मात्र अखेर त्यांना आपला देश सोडून जावंच लागलं.

स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक वीरांनी दिली प्राणांची आहुती

स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. आपल्या येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र हवेत श्वास घेणाऱ्या हव्यात यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडलं. त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे.

४ जुलै १९४७ ला काय घडलं?

४ जुलै १९४७ ला म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक महिना आधी भारताच्या स्वातंत्र्याविषयीचं एक विशेष विधेयक सादर करण्यात आलं. हे विधेयक १५ दिवसांमध्ये संमत करण्यात आलं. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देशातून युनियन जॅक हटला म्हणजेच ब्रिटिशांचं साम्राज्य संपलं आणि स्वतंत्र भारताचा उदय झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते.

भारताचा स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्टलाच का साजरा होतो?

४ जुलै १९४७ ला ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारताच्या स्वातंत्र्याबाबतचं विधेयक सादर केलं गेलं. त्यानंतर १५ दिवसात हे विधेयक संमत करण्यात आलं. या विधेयकात ही मंजुरी देण्यात आली होती की १५ ऑगस्ट १९४७ पासून ब्रिटिश शासन काळ समाप्त होईल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − six =

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…