Uday Samant: “बीकेसीवरच्या दसरा मेळाव्यानंतर खरी शिवसेना कुणाची हे फायनल झालं”

मुंबई तक

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी बीकेसीवर जो दसरा मेळावा पार पडला त्यानंतर हे स्पष्टच झालं की खरी शिवसेना कुणाची आहे? आमची शिवसेनाच खरी आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर दसरा मेळाव्यात आपण भाषण का केलं नाही? याचंही कारण उदय सामंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

बीकेसीवर जो दसरा मेळावा पार पडला त्यानंतर हे स्पष्टच झालं की खरी शिवसेना कुणाची आहे? आमची शिवसेनाच खरी आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर दसरा मेळाव्यात आपण भाषण का केलं नाही? याचंही कारण उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांचं नाव भाषणांच्या यादीत होतं. तरीही उदय सामंत यांनी भाषण केलं नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरही उदय सामंत यांनी उत्तर दिलं.

काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी?

बीकेसीवर जो दसरा मेळावा झाला त्या मेळाव्याने हेच सिद्ध केलं की खरी शिवसेना आमची आहे. असं महत्त्वाचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. निवडणूक आयोगासमोर ठाकरे विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाचा निकालही आमच्या बाजूने लागेल असा विश्वासही शिंदे गटाने व्यक्त केला आहे. अशात उदय सामंत यांनी खरी शिवसेना आमचीच आहे हे स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp