Yakub Memon Grave: 30 वर्ष शिवसेनेच्या नाकाखाली हे सगळं सुरू होतं- आशिष शेलार

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आता भाजपनं शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती सडकून टीका केली आहे.

शिवसेनेविषयी काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलारांनी शिवसेनेवरती टीका करताना नवाब मलिकांनाही टार्गेट केले आहे. ”सत्तेत असताना शिवसेना दाऊदचं समर्थन करताना आम्ही पाहिलं पण आता याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण करण्यासाठी परवानगी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित होतो. कब्रिस्तानची सर्व देखरेख मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. त्या महापालिकेत शिवसेनेची 30 वर्ष सत्ता आहे. त्यांच्या नाका खाली हे सगळं सुरू होतं. यांच्याच सरकारमध्ये अस्लम शेख, काँग्रेसचे मंत्री मुंबईचे पालकमंत्री झाले.

यांनीच याकुबला फाशी नको अशी मागणी केली होती.” असं आशिष शेलार म्हणाले आहेत. पुढे आशिष शेलार म्हणाले ”वानखेडे उखडण्यासाठी सेना गेली होती, पेंग्विन सेना आता या कब्रिला उखडवण्यासाठी जाणार का?. अस्लम ते नवाब आणि महापालिकेतील पेंग्विन सेना सोबत काम करत होते. तुकडे तुकडे गँगच्या दबावाखाली पेंग्विन सेनेने हे काम केलं असावं” असं आशिष शेलार म्हणाले आहेत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दहशतवाद्याला जिवंत ठेवण्यासाठी मागणी करणारे काँग्रेसचे- आशिष शेलार

काँग्रेसला स्मृतीभ्रंश झाला आहे. केंद्रात गृह मंत्री सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे होते. अस्लम शेख कोणाचे आमदार आहे हे सांगा… दहशतवाद्याला जिवंत ठेवण्यासाठी मागणी करणारे काँग्रेसचे लोक होते हे कसे विसरलात? असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आशिष शेलांरांनी डिवचलं

मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा आहे. मेळावा कोण घेणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे याविषयी अजून स्पष्टोक्ती मिळालेली नाहीये. त्यावरुन शेलार म्हणाले ”एकनाथ शिंदेंना दाबण्याचे काम पेंग्विन सेनेनं केलं. आता त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले म्हणून त्यांच्या पोटात मुरडा आला आहे. जो बाळासाहेबांचे विचार मांडेल तोच शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेईल. विचारांचा वारसा पेंग्विन सेनेकडे आहे. असं असलं तरी कायदा आपलं काम करेल.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT