‘बदला, सूड, खुनशी वृत्ती तुमचीच…!’ CM शिंदेंनी ठाकरेंवर थेट केला वार

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on to take revenge
CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on to take revenge
social share
google news

मुंबई : “बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे”, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांच्या “मी बदला घेणारच” या वक्तव्यावर थेट टीका केली आहे. (CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on to take revenge)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय, गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले होते, इतर मोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. एक ट्विट बघितले मी की, ब्रँडेड शू बनवणारी एक कंपनी महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यामुळे 2 हजार 300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असं सांगितलं होतं, फोटो काढले होते.

हे ही वाचा : ‘रिफायनरी लोकांच्या हिताची मग जबरदस्ती का?’ बारसूवरून उद्धव ठाकरे संतापले

पण आज कळलं की ती जो़डे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूला गेली. हे बसलेत जोडे पुसत आणि जोडे बनवतात तिकडे. तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. म्हणजे जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत, महाराष्ट्राचं पुढे काय होणार? ठीक आहे मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही करता येणार शक्य होतं ते मी केलं. पण ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं, त्याचा तर सूड, बदला घ्यायचाच, घेणारचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

जोडे पुसण्याच्या मुद्द्यावरुन शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं :

दरम्यान, जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत, या वक्तव्यावरुनही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं. ते म्हणाले, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.

ADVERTISEMENT

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे….

हे ही वाचा : ”ते’ विश्वासघातकी नसतात; चहावाला, रिक्षावालाही…’, CM शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं!

केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT