“लाज वाटायला पाहिजे, बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली” : तानाजी सावंत
कधीकाळी मातोश्री म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र आता शिंदे गटात गेल्यापासून तानाजी सावंत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. नुकतंच उस्मानाबाद येथे झालेल्या मेळाव्यात सावंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”, अशा शब्दात […]
ADVERTISEMENT

कधीकाळी मातोश्री म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र आता शिंदे गटात गेल्यापासून तानाजी सावंत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. नुकतंच उस्मानाबाद येथे झालेल्या मेळाव्यात सावंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद पवारांच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचे विचार सोडून देण्याचं काम तुम्ही केलं, असं सावंत म्हणाले.
बाळासाहेबांचा फोटो लावू नका म्हणण्याचा तुम्हाला अधिकार काय?
पन्नास खोके, गद्दार, मुर्दाबाद, अमुक तमुक आम्हाला म्हणतात. आमचं तर सोडा पण ज्या बापाने जन्म दिला त्या बापाचे विचार तुम्ही सोडून दिले, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, असं सावंत म्हणाले. तुम्ही म्हणता माझ्या बापाचे फोटो लावायचे नाही, मग आमचा शिवबा तुम्हाला चालतो. महात्मा गांधी, बाळासाहेब, आनंद दिघे, शिवाजी महाराज, अंबाबाई यांचे फोटो लावा किंवा लावू नका असं म्हणण्याचं तुम्हाला काय अधिकार, असा प्रश्न त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.
खोक्याबद्दल बोलायला लावू नका, उद्धव ठाकरेंना इशारा