Supriya Sule: “मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते, देवेंद्र फडणवीस…”

मुंबई तक

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप काळजी वाटते. मला वाटतं त्यांच्यामागे खूप मोठं षडयंत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दाम प्रॉम्प्टिंग करणं, त्यांना चिठ्ठी पाठवणं यातून त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटातील महिलांसाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप काळजी वाटते. मला वाटतं त्यांच्यामागे खूप मोठं षडयंत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दाम प्रॉम्प्टिंग करणं, त्यांना चिठ्ठी पाठवणं यातून त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटातील महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा महिला बचत गटाच्या कार्यक्रमात सहभाग होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते असं म्हणत देवेंद्र फडणवीस हे त्यांना कमी दाखवत आहेत असा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्या चिठ्ठीवर बोलल्या…

सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात घडलेला प्रकार लक्षात घेण्यासारखा आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दिली. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री काही वेळ थांबले आणि चिठ्ठी वाचून बोलू लागले. यावरून चर्चा या रंगल्या आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून बोलतात का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खूपच काळजी वाटते.’

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूपच काळजी वाटते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे काहीतरी षडयंत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. एखादा नेता जेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्याला चिठ्ठी देणं, मागून प्रॉम्प्टिंग करणं हे सगळं किती योग्य आहे? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.

हे वाचलं का?

    follow whatsapp