विधान परिषद: Nana Patole यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले सत्यजीत तांबेंना..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Vidhan Parishad election Nana Patole reaction on Satyajeet Tambe: मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन (Nashik Vidhan Parishad Election) राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. तर दुसरीकडे या सगळ्याला भाजपची (BJP) फूस असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघाकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्यजीत तांबेंबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता यापुढे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. (legislative council election nana patoles big statement said satyajeet tambe has no support from congress)

विधान परिषद निवडणुकीबाबत नेमकी काय भूमिका घेतली जावी यासाठी आज (18 जानेवारी) मुंबईत महाविकास आघाडीची एक बैठक पार होत आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बंडखोराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही त्यामुळे सत्यजित तांबेंचा विषय संपला आहे.’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघीण’; कोण आहेत शुभांगी पाटील?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले:

‘पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या पाच जागांबाबतची आमची भूमिका उद्या स्पष्ट करू. यासंदर्भात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आज बैठकीत चर्चा करणार आहेत.’

‘भाजप सारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित विधान परिषदेची निवडणूक लढतोय आहे. जागा शिवसेनेला जाते की, काँग्रेस-राष्ट्रवादी यापैकी कोणाला जागा जाते ही आमची भूमिका नाही. आज आमची भूमिका एकोप्याने या हुकूमशाही व्यवस्थेला संपविण्याची आहे.’

ADVERTISEMENT

‘आपण पाहिलं की, भाजपला नाशिकमध्ये उमेदवारही सापडला नाही. भाजपची अवस्था काय हे देखील स्पष्ट झालं आहे. म्हणून आमची एक रणनिती आहे. आम्ही मुद्दामहून निर्णय घोषित करायला उशीर करतोय. यामागे आमची ही रणनीती आहे.’

ADVERTISEMENT

‘महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या आता बैठक आहे.आज किंवा उद्या आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आमची भूमिका आम्ही जाहीर करू. यात आमची एक रणनिती होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. भाजप नाशिकमध्ये उमेदवारही देऊ शकला नाही ही खऱ्या अर्थाने भाजपची जी खेळी होती दुसऱ्यांची घर फोडण्याची त्यात भाजपच स्वत: फसली आहे.मी तुम्हाला सांगत आहे की, महाविकास आघाडी म्हणून भूमिका मांडलेली नाही.’

विधान परिषद: शेवटच्या दिवशी रंगलं नाट्य, पण आता…

‘आम्ही त्यादिवशीच स्पष्ट केलंय की, बंडखोराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही त्यामुळे सत्यजित तांबेंचा विषय संपला आहे. मूळ प्रश्न हा आहे की, जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू तेव्हा तुम्हाला स्पष्टता येईल.’ असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

सत्यजीत तांबेंना का भरावा लागलेला अपक्ष फॉर्म?

‘आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळेस काँग्रेसमधील अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र, निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी तो जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी फॉर्म भरला. तरीपण मी फॉर्म भरताना दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावाचा AB फॉर्म हा वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल.’

‘परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे. सगळ्यांना मी विनंती करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना देखील भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपच्या सर्व नेत्यांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षाच्या विचारसरणी आणि सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं. अशी माझी अपेक्षा आहे.’ असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी आपण अपक्ष फॉर्म का भरला होता याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT