”आमची काही नॅचरल आघाडी नाही”; नाना पटोलेंनी दिले महविकास आघाडीच्या फुटीचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इसरार चिस्ती

औरंगाबाद: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करावं असं म्हणत एकनाथ शिंदे आणि सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडावी आम्ही लगेच परत येतो असे बंडखोर म्हणत होते. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडली नाही. आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आहेत.

आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारलं जात नसेल तर आम्ही चर्चा करू असे म्हणत नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही- नाना पटोले

शेतकऱ्यांना शिंदे सरकारनं हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याचे कालच्या बैठकीत जाहीर केले आहे. यावर नाना पटोले म्हणाले ”अधिवेशनात आम्ही मुद्दा मांडू. 75 हजार हेक्टरी मदत द्यायला हवी होती. शेतकऱ्याला चांगली मदत द्यायला हवी हे सरकार लॉलीपॉप देत आहे. येणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीने सोबत लढव्या की नाही याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही”.

आमची काही नॅचरल आघाडी नाही- नाना पटोले

शिवसेनेने विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवावे. महाविकास आघाडी ही काय आमची काही नॅचरल युती नाही, चर्चांकरून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. विधान सभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता झाला, विधान परिषदेमध्ये आम्हाला नेता हवा होता, बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला असे नाना पटोले म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

शिंदे सरकार गुजराती नेत्यांसाठी

सत्तेचे वाटेकरी हे सगळे आहेत, ही जनतेचं सरकार नाही. मलाईदर खात्यासाठी रस्सी खेच सुरु आहे. गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ब्लॅकमेल सरकार आहे, देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे जे काम सुरु आहे, त्यासाठी आमची ही यात्रा असल्याचे नाना पटोले म्हणाले. काँग्रेसची सध्या आझादी गौरव पदयात्रा सुरु आहे, आज यात्रा औरंगाबादमध्ये पोहोचली आहे. तिथे नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT