‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. सध्या बारामतीत भाजपचं लक्ष आहे, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, राजकीयदृष्टीने बारामतीत विरोधकांनी जरूर यावे. मी त्यांचं स्वागत करेन. मात्र लोकसभा मतदानावेळी बारामतीची जनता मतपेटीतून आमची ताकद दाखवून देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार, अजित पवार आणि मी सामाजिक बांधीलकीनं बारामतीत विकास कामं केली आहेत, त्यामुळे विरोधक देखील बारामतीसारखा विकास करायला पाहिजे असं सांगतात.

बारामतीत येण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांना लोकशाहीने दिला आहे. जर भारताच्या अर्थमंत्री बारामतीत येत असतील तर चांगलंच आहे, जर मी तिथे असेल तर त्यांचं स्वागत करेन. पण माझं संविधान आणि जनतेवर विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या. त्याच बरोबर बारामतीवर इतके लोक लक्ष घालत असतील तर बारामतीमध्ये काहीतरी विशेष असणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यसरकारवर साधला निशाणा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात चांगले कामं होत होते. मात्र सरकार पाडण्यात घाई केली. ते करताना दुसऱ्या राज्याची मदत घेतली, हे दुर्दैवी आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला मात्र अद्याप पुणे जिल्ह्यासह राज्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्री अभावी राज्याचा विकास ठप्प झाला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असताना सर्व दृष्टिकोनातून कामकाजाचे निर्णय तत्परतेने घेतले जात होते. मात्र आता पालकमंत्र्यांअभावी विकास कामाचे निर्णय प्रलंबित झालेले आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकनाथ शिंदेंना लगावला टोला

ADVERTISEMENT

जनतेची कामं रखडली गेली. महाविकास आघाडीत वेगाने विकास कामं होत होती. मात्र हे नवीन सरकार घेतलेले निर्णय स्थगित करत आहेत. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाला रद्द केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत आल्यावर पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडीचं विधेयक आणलं आहे. यावर बोलताना पूर्वीच्या सरकारमध्ये असताना एक निर्णय आणि नंतर शेजारी बदलला की दुसरा निर्णय घेतला जातोय, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टोला लगावला.

ADVERTISEMENT

आमदारांनी महिलांबाबत सन्मानाने बोलावं

भाजप आमदार योगेश सागर यांची मुंबईतील रस्त्याबाबत बोलताना जीभ घसरली होती. त्यांनी याबाबत बोलताना महिलाबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. यावादग्रस्त वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिलांबद्दल असे बोलणं योग्य आहे का? हा शाहू, फुले, आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महिलांचा अशा पध्दतीने उल्लेख करणं गरजेचं आहे का? महिलांचा उल्लेख आदराने होणं गरजेचं आहे. आमदारांना विनंती आहे की, आपण बोलताना आपण मान सन्मानाने बोललं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT