अंबरनाथ गोळीबारामागे राजकारण काय? फडके-पाटलांमध्ये का वाजलं?

मुंबई तक

गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी आणि बैलगाडा. नवी मुंबईच्या, कल्याण डोंबिवलीच्या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव येतंच! अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून १३ नोव्हेंबरला पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी आणि बैलगाडा. नवी मुंबईच्या, कल्याण डोंबिवलीच्या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव येतंच!

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून १३ नोव्हेंबरला पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला 2 बैलगाडा मालकांमध्ये हा वाद झाला असे त्याचे स्वरुप होतं. पण पोलीस तपासात या गोळीबारामागे कल्याण-डोंबिवलीमधील राजकारण समोर आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?

राज्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करायच्या यासंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती. पंढरी फडके आणि राहुल पाटील या बैठकीसाठी निघालेले असताना अंबरनाथजवळ दोन्ही गट एकमेकांसमोर येताच, त्यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून पंढरी फडके याचा चालक एकनाथ फडके याने आपल्याकडील बंदुकीतून राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp