शिवसेना-राष्ट्रवादीच्या ‘त्या’ वादाचं गुपित भास्कर जाधवांनी केलं क्लिअर!

मुंबई तक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होऊन काही वेळ होत नाही तोच अशा बातम्या समोर येऊ लागल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपला उमेदवारासोबत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मतदानाचा कोटा 42 वरुन 44 केल्याचं बोललं जात होतं. पण या सगळ्या वादाचं नेमकं गुपित काय आहे हे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी क्लिअर केलं आहे. जेव्हा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होऊन काही वेळ होत नाही तोच अशा बातम्या समोर येऊ लागल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपला उमेदवारासोबत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मतदानाचा कोटा 42 वरुन 44 केल्याचं बोललं जात होतं. पण या सगळ्या वादाचं नेमकं गुपित काय आहे हे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी क्लिअर केलं आहे.

जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या तेव्हा मात्र, शिवसेनेत काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु झाली की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या भूमिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाले आहेत. मात्र, जेव्हा ‘मुंबई Tak’ने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी एकूण चर्चेबद्दल किंवा वादामागचं नेमकं गणित काय आहे ते सांगितलं.

पाहा भास्कर जाधव काय म्हणाले:

‘आज आम्ही खूप आनंदी आहोत, खुशीत आहोत.. भाजपचे उमेदवार पराभूत होऊन महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील काही चिंता करण्याचं कारण नाही. गुलाल आमचाच.. काही चिंता नाही, मिरवणूक आमचीच.’ अशा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp