ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena (UBT) News :

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेना (UBT) चे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाईंचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे. भूषण देसाई यांचा आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वतः भूषण देसाई यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray’s close Subhash Desai’s son Bhushan Desai join Eknath Shinde.)

सुभाष देसाई ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय :

सुभाष देसाई यांच्या मुलानेच ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही जवळच्या गोटातील नेते मानले जाऊ लागले. पक्षसंघटनेतील काही मोजक्या जुन्या नेत्यांच्या यादीत सुभाष देसाई यांचं नावं अग्रक्रमाने घेतलं जातं. २००५ मध्ये त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुभाष देसाई यांची संसदीय कारकिर्द १९९० साली सुरु झाली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. २००९ ते २०१४ या काळात देसाई यांच्यावर शिवसेनेच्या विधिमंडळनेतेपदाचीही धुरा सोपविण्यात आली होती. पुढे देसाई यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. या दरम्यान त्यांच्याकडे राज्याचे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्येही ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देसाई यांची निवड झाली होती.

भूषण देसाईंवर भाजपने केले होते भ्रष्टाचाराचे आरोप अन् चौकशीचीही मागणी :

भूषण देसाई यांच्यावर महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वेदांता-फॉक्सकॉन आणि ‘एअरबस- टाटा’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकल्प गुजरातला गेल्याचे आरोप करत तत्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आणि त्यांचा मुलगा भूषण देसाई यांच्यावर उद्योगपतींकडून टक्केवारी मागितल्याचा आरोप केला होता. तसंच ही टक्केवारी मातोश्रीवर दिली जात असल्याचही ते म्हणाले होते.

ADVERTISEMENT

याशिवाय दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीमध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. तसंच याप्रकरणात एसआयटी स्थापन करुन सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांची चौकशी करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली होती. यानंतर आता भूणष देसाई हे स्वतः शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे आता याबाबत भाजपची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT