Uddhav Thackeray : “दोघेजण दिल्लीत चकरा मारत आहेत, पाळणा काही हलत नाही”

मुंबई तक

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्टला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ९ आमदार मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना फोन गेले असून मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दोघे दिल्लीत चकरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्टला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ९ आमदार मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना फोन गेले असून मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दोघे दिल्लीत चकरा मारत आहेत मात्र पाळणा काही हलत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Uddhav Thackeray : “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, कुणी हात लावायचा प्रयत्न केला….”

काय म्हटलं आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी?

दिल्लीत दोघंजण चकरा मारत आहेत, पण पाळणा काही हलत नाही. आता बातमी आली आहे की मंगळवारी (९ ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार? शिवसेनेवर टीका करत होते. संपलेला पक्ष म्हणत आहेत. मात्र मैदानात उतरा ना.. आणि हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान देत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. तसंच मी आता मैदानात उतरलो आहे, पळणार नाही. निष्ठा आणि पैसा यांच्यात ही लढाई आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ताकद कुणाची शिवसेनेची अशा घोषणाही यावेळी इथे जमलेल्या शिवसैनिकांनी दिल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp