आधी उद्धव ठाकरेंसाठी रडले, नंतर शिंदे गटात गेले; निर्णय बदलण्यावर संतोष बांगर काय म्हणाले?

मुंबई तक

शिवसेनेतलं बंड हे अभूतपूर्व होतं हे आता सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी ३९ शिवसेना आमदारांना सोबत घेत उठाव केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही १६४ मतं मिळवत जिंकली. २१ जूनला हे बंड झालं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना साद घालणारे आणि उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अश्रू आणून रडणारे संतोष बांगर आता शिंदे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेतलं बंड हे अभूतपूर्व होतं हे आता सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी ३९ शिवसेना आमदारांना सोबत घेत उठाव केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही १६४ मतं मिळवत जिंकली. २१ जूनला हे बंड झालं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना साद घालणारे आणि उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अश्रू आणून रडणारे संतोष बांगर आता शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० झाली आहे.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

या सगळ्याबाबत शिवसेनेचे बंडखोर आमदार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. संतोष बांगरजी तुम्ही उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात पाणी आणून बंडखोर आमदारांना परत यायचं आवाहन केलं होतं. मग आता तुम्ही एकनाथ शिंदे गटात कसे गेलात? हा प्रश्न विचारल्यावर संतोष बांगर म्हणाले ‘मी जाऊ का निघून इथून? नो कमेंट्स’ उद्धवजींचा मावळा असं स्वतःला म्हणवून घेणाऱ्या संतोष बांगर यांनी शिंदे गटात का गेलो हे बोलणं टाळलं आहे.

असं असलं तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा विश्वासदर्शक ठराव १६४ मतं मिळवत जिंकला तेव्हाच त्यांनी संतोष बांगर आपल्यासोबत कसे आले ते सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp