महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप, ऐन रात्री ‘ऑपरेशन टायगर’ सुरू.. ठाकरेंचे खासदार थेट…

मुंबई तक

‘ऑपरेशन टायगर’ हे आता अंतिम टप्प्यात आलं असून ठाकरे गटाचे 6 ते 7 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असून त्यापैकी काही जण दिल्लीसाठी रवानाही झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राबवण्यात येत असलेल्या "ऑपरेशन टायगर"ला आता नवे आणि अंतिम वळण मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे तब्बल सहा ते सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यापैकी काही जण दिल्लीला रवानाही झाले आहेत. या नव्या राजकीय भूकंपामुळे राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीत वाढल्या हालचाली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले असून पुढील काही तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः संसद अधिवेशन आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे फुटलेले खासदार हे लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही देण्याची शक्यता आहे.

कोणत्या खासदारांची नावे चर्चेत?

हे वाचलं का?