'...तर 30 मे पासून आमरण उपोषण' मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

मुंबई तक

'मराठ्यांनी पिकांचे नुकसान करू नका. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. कोणाच्या मिरचीला, उसाला हात लावू नका. आंदोलन अंतरवाली मधे शांततेत होणार. 30 मे रोजी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार' असं जरांगेंनी सांगितलं. 

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Press Conference
Manoj Jarange Patil Press Conference
google news

बातम्या हायलाइट

point

'...तर 30 मे पासून आमरण उपोषण'

point

मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange Patil Press Conference : अंतरवाली सराटीत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला आंदोलनाचा तीव्र इशारा दिला. ते म्हणाले की, 'मराठ्यांनी पिकांचे नुकसान करू नका. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. कोणाच्या मिरचीला, उसाला हात लावू नका.आंदोलन अंतरवाली मधे शांततेत होणार. 30 मे रोजी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहे.'

'आमचे प्रमाणपत्र तुम्हीच रोखलेत'

यापुढं बोलताना जरांगे म्हणाले की, 'अधिकाऱ्यांना जर विचारलं की कुणबी प्रमाणपत्र हैदराबाग गॅझेटियरनुसार द्या, तर ते म्हणतात की सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? तर देवेंद्र फडणवीस साबेहच. दुसरा कोणी नाही. फडणीवसांनी चार-पाच महिन्यांपूर्वी अधिवेशनात भाषण केलेलं. यात ते म्हटले की मंत्र्याला किंमत नाही. मुख्यमंत्रीच सर्व असतो. मग आमचे प्रमाणपत्र तुम्हीच रोखलेत.'

हे ही वाचा : 'सध्या फक्त ट्रेलर दाखवलाय..' लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुण्यातील मॉलवर गोळीबार, कुणाला दिली वॉर्निंग?

'फडणवीस साहेब तुम्ही गोरगरिबांची मनं जिंका'

हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढला. त्याची अंमलबजावणी सरकारनं केली. या गॅझेटियरनुसार 308 कुणबी प्रमाणपत्र निघाली असं सरकारनं जाहीर केलंय. याचा अर्थ असा की हैदराबादचा जीआर लागू झाला, त्याची अंमलबजावणी झाली. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाहीत? जो स्थानिक चौकशी अहवाल तयार केलाय त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजेत. तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब तुम्ही गोरगरिबांची मनं जिंका. आम्हाला काय करायचं सत्तेचं? मला त्याची हाव नाही. माझ्या समाजालाही नाही. पण आमची लेकरं नाही मरु देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही तर तुमच्या पन्नास पिढ्याही आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही. मराठ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

हे वाचलं का?