"तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव
Pahalgam Terror Attack:प्रीती कदम यांनी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना या टॅक्सी चालकाचा शोध घेऊन तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी काढलेले फोटो आणि दिलेली माहिती तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहलगामधील हल्ल्यापूर्वी कुडाळच्या महिलेला काय अनुभव आला?

कुडाळमधून पहलगामला गेलेल्या महिलांना टॅक्सीचालक काय म्हणाला?
कुडाळ, सिंधुदुर्ग : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रीती कदम यांना काश्मीर दौऱ्यादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची चाहूल लागल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >> "अक्षय शिंदेलाही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकंच...", किरण मानेंची काय म्हणाले, निशाणा कुणावर?
नेमकी घटना काय?
प्रीती कदम या आपल्या कुटुंबातील तीन अन्य महिलांसह चार जणी काश्मीर दौऱ्यासाठी गेल्या होत्या. पहलगाम येथे त्यांना एका टॅक्सी चालकाने अत्यंत उद्धट वागणूक दिली. आणि धमकावणारी वागणूक दिली. प्रीती कदम यांच्या मते, "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता. त्याने आमचं सामान रस्त्यावर फेकलं, आमच्याकडून पैसे उकळले आणि मध्येच सोडून दिलं. त्याचं बोलणंही धक्कादायक होतं. तो म्हणाला, 'तुम्हाला कोणी गोळी मारली तरी आम्हाला फरक पडत नाही. मला पोलिस आणि एसआरपीचा तिटकारा आहे. मला फक्त पैशांशी मतलब आहे."
काय म्हणाल्या प्रिती कदम?
"आम्हाला जो टॅक्सी ड्रायव्हर आला तो जरा रागीट आणि विचित्र स्वभावाचा होता. पहलगाममध्ये गेल्यावर पाईनचं जंगल दाखवत म्हणाला इथे सगळ्या चुडैल राहतात. पोलीसच्या गाड्या दिसल्यावर म्हणत होता पोलीस आणि सीआरपीएफशी खूप नफ्रत आहे. पुढे गेल्यावर गाडी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि म्हणाला उतरो गाडी से... आमचं सामान खाली टाकून दिलं."
या घटनेनंतर प्रीती आणि त्यांच्या सहकारी महिलांना दुसऱ्या टॅक्सीची वाट पाहत थांबावं लागलं. मुंबईत परतल्यानंतर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच प्रीती कदम यांना धक्का बसला. त्यांना टॅक्सी चालकाच्या वागणुकीतून हल्ल्याची चाहूल लागल्याची शंका निर्माण झाली. त्यांनी हा अनुभव कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन नाईक यांच्याशी शेअर केला. नाईक यांनी प्रीती यांना धीर देत त्यांचा अनुभव कॅमेऱ्यासमोर मांडण्यास प्रोत्साहित केलं.