Manoj Jarange Patil : प्रसाद लाडांचं विधान ऐकून जरांगे पाटलांच्या संतापाचा कडेलोट; म्हणाले, “तुला…”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil reply bjp prasad lad antarawali sarati maharashtra poliitics
maratha reservation manoj jarange patil reply bjp prasad lad antarawali sarati maharashtra poliitics
social share
google news

Manoj Jarange Patil Reply to Prasad Lad : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुकारलेल्या आंदोलनाला एकीकडे काही आमदारांकडून समर्थन मिळत असताना, दुसरीकडे काही आमदार जरांगे पाटलांवर सवाल उपस्थित करत टीका करतायत. भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी नुकतंच जरांगे पाटलांना ”तुमचा बोलवता धनी कोण?” असा खडा सवाल केला होता. या सवालावर आता जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे पाटलांच्या या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (maratha reservation manoj jarange patil reply bjp prasad lad antarawali sarati maharashtra poliitics)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीआधीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परीषद घेतली होती. या पत्रकार परीषदेत जरांगे पाटलांना प्रसाद लाड यांनी केलेला ”तुमचा बोलवता धनी कोण?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी ”तुला सांगतो भेटल्यावर” असं उत्तर दिले आहे.

हे ही वाचा : Shiv Sena : उद्धव ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा

ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका का? तुमचा बोलवता धनी कोण? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला होता. तसेच नितेश राणे यांनी देखील ‘तुम्हाला नेमकं लिहून कोण देतोय?’ असा प्रश्न केला होता. हाच प्रश्न माध्यमांनी जरांगेना विचारला. यावर जरांगे म्हणाले, ”एकीकडे फोन करून मला गोडगोड बोलायचं”. ”आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे”.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांवर टीका

मराठा तरूण शांतच आहे. पण यांना आंदोलन दडपायचं, वातावरण खराब करण्याची इच्छा यांची आहे.इंटरनेट बंद करून चिल्लर चिल्लर चाळे करतायत, अशी टीका जरांगे पाटलांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. एकीकडे बोलुन दाखवतो आणि दुसरीकडे गोड बोलतो. हे त्याचेच काम आहे, त्यांनी बोलून दाखवलं होतं 307 करायला लावेन, म्हणून भाजप संपतंय, असा हल्लाही जरांगे पाटलांनी नाव न घेता फडणवीसांवर केला. तसेच गोरगरीबाच्या पोराला मारं देतो आणि स्वत: ला उच्च नेता म्हणतो, आता तुला कळेल तु उच्च आहे की नाही? मतदानाची चिठ्ठ्या वाटण्याच्या लायकीचा आहेस अशी टीका देखील जरांगे पाटलांनी केली.

जरांगे पाटलांची आमदारांना विनंती

‘गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आणि समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो”, ”आमदारांनी मुंबई सोडू नका”. ”विशेष अधिवेशन तातडीन बोलवायला लावा”.”या अधिवेशनात महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी करा” आणि ”सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडा”, अशी विनंती जरांगे पाटलांनी आमदारांना सर्वपक्षीय बैठकीआधी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sachin Pilot-Sara Love Story : घरच्यांचा विरोध तरीही…; पायलटांची ‘सैराट’ लव्ह स्टोरी

दरम्यान आज जर अधिवेशनाची घोषणा केली नाही आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची घोषणा झाली नाही. सरसरट कुणबी प्रमाणपत्र नाही दिली तर संध्याकाळपासून पाणी सोडणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. त्याचसोबत आमच्याकडून उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. शांततेत आंदोलन सुरु राहतील. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय उठणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT