फडणवीस-ठाकरेंची 'राज' भेट, दुसरीकडे मनसे नेते उदय सामंतांना भेटले, घडामोडींचा अर्थ काय?

मुंबई तक

राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेतल्यानंतरच अवघ्या काही तासांतच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि नेते अमेय खोपकर यांनी शिंदेंच्या नेत्याची भेट घेतली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला राज ठाकरे

point

दुसरीकडे मनसे नेतेही उदय सामंत यांच्या भेटीला

point

राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युतीचं काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. मुंबईत भेटीगाठींना वेग आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईतील एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मुंबईत काय घडामोडी घडल्या?

हे ही वाचा >> Sangli Crime: वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा घेतला जीव, पत्नीने लग्नाच्या 15 दिवसातच थेट कुऱ्हाडीनेच...

राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेतल्यानंतरच अवघ्या काही तासांतच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि नेते अमेय खोपकर यांनी शिंदेंच्या नेत्याची भेट घेतली. मनसे नेत्यांनी उदय सामंत यांच्या ‘मुक्तागिरी’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटींमुळे मनसे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसेने आधी भाजप नेते आणि नंतर शिंदे गटाशी चर्चा सुरू केल्याने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे महायुतीसोबत हातमिळवणी करेल, अशी शक्यता बळावली आहे.

आधीही जवळ आले, पण पुन्हा दूर गेले

यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी मनसे आणि महायुतीमध्ये जवळीक असल्याची चर्चा होती. मनसेला काही जागा सोडल्या जाण्याची शक्यता होती, परंतु माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीविरोधात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. यामुळे मनसेने 125 जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. महायुती सत्तेत आल्यानंतरही मनसेला सत्तेत स्थान मिळाले नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये काहीसे अंतर निर्माण झाले होते.

हे ही वाचा >>धर्म बदलण्यासाठी सासरच्यांकडून छळ, सांगलीत गर्भवती महिलेनं स्वत:ला संपवलं, कुटुंबीय म्हणाले...

दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या, त्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये या दोघांच्या एकत्रित ताकदीचा प्रभाव पडू शकतो, हे ओळखून महायुतीने आता पुन्हा मनसेशी वाटाघाटी सुरू केलीये का? असाव सवाल उपस्थित होतोय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp