संजय राऊत भडकले, राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले, पत्रकार परिषदेत काय घडलं?

मुंबई तक

rajabhau waje emotional : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संजय राऊत यांनीही संभाव्य बंडखोरांवर जोरदार टीका केली.

ADVERTISEMENT

rajabhau waje emotional
rajabhau waje emotional
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत भडकले

point

राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले

point

पत्रकार परिषदेत काय घडलं?

rajabhau waje emotional : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा चांगलीच रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या आणि ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संभाव्य बंडखोरीच्या चर्चेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचेही नाव घेतले जात होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे यांनी अत्यंत भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसले, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी संभाव्य बंडखोरांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.

हेही वाचा : चंद्रपूर : आधी आईचा जळून मृत्यू, नंतर चिमुरडा नाल्यात बुडाला; एकाच दिवशी काय घडलं?

राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले

राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. आपल्या निष्ठेबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सूचित केले. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणात विविध माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांमुळे वातावरण तापले असले तरी आपण पक्ष सोडत असल्याचा कोणताही प्रश्न नसल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती फिरणाऱ्या सर्व चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?