समजून घ्या: ममता बॅनर्जींच्या मनात असलं तरी काँग्रेसमध्ये होऊ शकणार नाही विलीन.. कशी केली तटबंदी?
तृणमूल काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्याने हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची वेळ आली आहे का या चर्चा सुरू आहेत. पण ममतांची राजकीय तटबंदीच आता अशी झाली आहे की कितीही मनात आलं तरी त्या पक्ष विलीन करू शकणार नाहीत, कसं ते समजून घेऊ.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्याने हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची वेळ आली आहे का या चर्चा सुरू आहेत. पण ममतांची राजकीय तटबंदीच आता अशी झाली आहे की कितीही मनात आलं तरी त्या पक्ष विलीन करू शकणार नाहीत, कसं ते समजून घेऊ.
लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करण्याची प्रक्रिया संविधानातील दहाव्या परिशिष्टात आहे. म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यात. ज्यानुसार, दोन गोष्टींची पूर्तता होणं अपेक्षित आहे.
1. विधिमंडळ पक्षातील दोन तृतीयांश आमदार-खासदारांची सहमती हवी.
2. मूळ राजकीय पक्षाची सहमती हवी.
नेमकी काय अडचण आहे?
या दोन्ही गोष्टींची पूर्तता होत असेल तर आमदार-खासदारांच्या गटाला त्याबाबत विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांना अवगत करावं लागतं, विलीन होणारा पक्ष आणि ज्या पक्षात विलीन होणार या दोन्ही पक्षांची बैठक बोलावून त्यात ठराव मंजूर करावा लागतो, त्याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी लागते मग हे विलिनीकरण झालं असं मानता येतं. आता ही झाली कायदेशीर प्रक्रिया पण, दोन्ही अटींची पूर्तता होत असेल तरच एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. जर आमदार-खासदार तयार नसतील विलीन व्हायला तर मूळ राजकीय पक्षाला वाटलं तरी ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाहीत.









