Maharashtra Politics: पक्ष आणि चिन्ह जाणं पवारांना नवं नाही... पाहा त्याचाच A टू Z इतिहास!
Sharad Pawar NCP Party and Logo: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्याचं चिन्ह गमावलं आहे. पण या गोष्टी शरद पवार यांच्यासाठी नव्या नाहीत. त्यांना याआधी अशाप्रकारांना अनेकदा सामोरं जावं लागलं आहे. जाणून घ्या त्याचाच नेमका इतिहास.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Party History: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे अधिकृतपणे सोपवलं आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं तरीही पक्ष किंवा चिन्ह जाणं हे काही नवं नाही. कारण शरद पवार यांनी आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर आणि पक्षांच्या नावावर निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीत ते बरेच यशस्वी देखील राहिले आहेत. हाच सगळा त्यांचा इतिहास आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (sharad pawar has lost ncp party and symbol but these things are not new to him know his history related congress party and symbol)
शरद पवारांचा पक्ष, चिन्ह आणि निवडणुकीचा इतिहास...
साधारण 1960 साली शरद पवार हे स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रीय झाले होते. महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचं काम करताना एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केलेलं. त्यावेळी शरद पवारांच्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण हे प्रभावित झालेले. त्यानंतर यशवंतरावाच्या मार्गदर्शनानुसार शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
1967 च्या त्यांना काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं होतं. ज्यामध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विजयी मिळवला होता. तेव्हापासून शरद पवार हे पक्के काँग्रेसी नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. मात्र, मधल्या काळात अनेक राजकीय स्थितंतरं घडली. ज्यामध्ये इंदिरा गांधी या राजकारणात आल्यावर काँग्रेसचं विभाजन झालं. पण त्यानंतर पक्ष आणि देशाच्या पातळीवर इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं. तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता.
दरम्यान, इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवून देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि देशात जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं.