‘पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!’; आदित्य ठाकरेंनी 6 वर्षानंतरही ठणकावून सांगितलं!

मुंबई तक

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट केली आहे. “मी दिशाला कधीही भेटलो नाही,” असं सांगत त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने आणि वैयक्तिक द्वेषातून या प्रकरणाशी आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.”

‘पुरावा नसताना नाव जोडण्याचा प्रयत्न’

दिशा सालियन यांच्या मृत्यूशी आपला कोणताही संबंध नसतानाही काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राजकीय हेतू, वैयक्तिक द्वेष आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने हे केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा>> दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल

तसंच, तथ्य आणि सत्य नसलेलं हे सातत्याने सुरू असलेलं “खोटं कॅंपेन” दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.