धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टाची आजवरची सर्वात मोठी टिपण्णी, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टातील सुनावणीत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. विधिमंडळातील बहुमत, अपात्रतेची कार्यवाही आणि पक्षचिन्हाचा निर्णय याबाबत त्यांच्या टिप्पणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने पक्षातील कोणत्या गटाला राखीव चिन्ह द्यायचं, यासाठी वापरलेल्या निकषांवर चर्चा करताना न्यायमूर्ती बागची यांनी उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांकडेही लक्ष वेधलं.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची प्रकरणं सुरू आहेत.
‘दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवता आली असती’
न्यायमूर्ती बागची यांनी सुनावणीदरम्यान असा पर्याय मांडला की, जर निवडणूक आयोगासमोर असलेले तिन्ही निकष मर्यादित किंवा कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे असतील, तर कोणत्याही एका गटाला राखीव चिन्ह देणं आवश्यक नव्हतं.
त्याऐवजी दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हं देऊन स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगता आलं असतं, असं त्यांनी नमूद केलं.
