Narayan Rane :”शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा”
महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून स्वतःचा पक्ष आणि आमदार वाचवू शकले नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता गप्प बसून आराम करावा […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून स्वतःचा पक्ष आणि आमदार वाचवू शकले नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता गप्प बसून आराम करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही, आम्ही मार्ग काढू; संजय राऊत नाशिकमध्ये काय म्हणाले?
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडे कोणते प्रश्न सोडवले असा प्रश्न उपस्थित करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे तर संजय राऊत यांना गप्प बसून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
Uddhav Thackeray: “धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार”