World Cup 2023: भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न कसे भंगले? सेहवाग-गावस्करांनी सांगितली चूक

रोहिणी ठोंबरे

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचे 241 धावांचे लक्ष्य अवघ्या 43 षटकांत पार केले.

ADVERTISEMENT

How India's dream of winning the World Cup 2023 was shattered What are mistakes said by Sehwag and sunil Gavaskar
How India's dream of winning the World Cup 2023 was shattered What are mistakes said by Sehwag and sunil Gavaskar
social share
google news

Ind vs Aus World Cup 2023 Final : टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांना ज्याची भीती होती अखेर तेच घडलं. विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला चांगलच पछाडलं. रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचे 241 धावांचे लक्ष्य अवघ्या 43 षटकांत पार केले. टीम इंडियाच्या हातून हा सामना कसा निसटला ते जाणून घेऊया. (How India’s dream of winning the World Cup 2023 was shattered What are mistakes said by Sehwag and sunil Gavaskar)

मागील सर्व सामन्यांप्रमाणेच कर्णधार रोहित शर्माने फायनलमध्येही टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. रोहितने 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने झटपट 47 धावा केल्या. रोहितला साथ देत कोहलीनेही गीअर्स बदलले आणि मिचेल स्टार्कला एका षटकात सलग तीन चौकार ठोकले. पण रोहित शर्मा आऊट होताच टीम इंडियाच्या बॅटिंगला ग्रहण लागल्यासारखं वाटत होतं.

वाचा : Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण

सामना कुठे आणि कसा निसटला?

रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये जाताच टीम इंडिया बाउंड्रीसाठी आस लावून बसलेली दिसली. 11 ते 40 षटकांमध्ये फलंदाजांनी केवळ दोन चौकार मारले. यामध्ये 27व्या षटकात केएल राहुलच्या बॅटने एक चौकार तर 39व्या षटकात सूर्यकुमारच्या बॅटने एक चौकार केला. या काळात टीम इंडियाचा रन रेट 5 पेक्षा कमी होता.

पार्ट टाइम गोलंदाजांना लक्ष्य करण्यात आले नाही

टीम इंडियाच्या या कामगिरीवर माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर नाराज दिसले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, ‘कोहली आणि केएल राहुल यांनी त्यांच्या पार्टरनरशिपवेळी पार्ट टाइम गोलंदाजांना लक्ष्य केले नाही.’ दोघांनी ब्राउंड्री केली नाही, पण कमीत कमी सिंगल घ्यायला पाहिजे होतं. असं त्यांचं मत आहे. तेव्हा भारताला 270 धावांचे लक्ष्य देता आले असते.

हे वाचलं का?

    follow whatsapp