IND vs SA: भारतीय संघात दिग्गजांचा भरणा, संघ निवड ठरणार डोकेदुखी?

मुंबई तक

भारतीय संघ (Team India) येत्या सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. नुकताच आयपीएलचा (IPL 2022) हंगाम संपवून भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेसोबत दोन हात करणार आहेत. पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय संघ (Team India) येत्या सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. नुकताच आयपीएलचा (IPL 2022) हंगाम संपवून भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेसोबत दोन हात करणार आहेत.

पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक नवोदितांना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही पाच सामन्यांची मालिका आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) महत्त्वाची मानली जाते.

विराट, रोहित नसताना फलंदाजीचं गणित

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भारतीय फलंदाजीची ढाल समजले जातात, आता त्यांनीच या मालिकेमधून माघार घेतल्याने भारतीय फलंदाजीची मदार इशान किशन, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत. श्रेयश अय्यर यांच्या खांद्यावरती आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp