T20 WC: Captain पदाबाबत प्रश्न विचारताच विराट कोहली भडकला…

मुंबई तक

T20 WC, Virat Kohli: कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, टी-20 वर्ल्डकपनंतर तो टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नानंतर विराट कोहलील चिडलेला पाहायला मिळाला. कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर जेव्हा विराटला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विराट कोहली चांगलाच भडकला. यावेळी विराट कोहली म्हणाला की, ‘मला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

T20 WC, Virat Kohli: कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, टी-20 वर्ल्डकपनंतर तो टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नानंतर विराट कोहलील चिडलेला पाहायला मिळाला.

कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर जेव्हा विराटला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विराट कोहली चांगलाच भडकला. यावेळी विराट कोहली म्हणाला की, ‘मला जे म्हणायचे होते ते मी आधीच सांगितले आहे, परंतु जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा त्या गोष्टीतच डोकावयाचे असेल तर मी काहीही करू शकत नाही.’

कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘मी लोकांना सर्वकाही आधीच सत्य सांगितले आहे, पण जर लोकांना असे वाटत असेल की अजून यामध्ये काही आहे तर तसे अजिबात नाही.’

विराट कोहलीने पुढे असंही म्हटलं की, ‘आमचे संपूर्ण लक्ष हे सामन्यावर आणि विश्वचषकावर आहे. अशा परिस्थितीत लोकांना अजूनही काहीतरी काढायचे आहे जे खरं तर नाहीच आहे, त्यामुळे मी अशा गोष्टींना अजिबात महत्त्व देत नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp