U-19 WC Final: कॅरेबिअन बेटांवर टीम इंडियाचा विजयी ‘पंच’, इंग्लंडवर मात करुन पटकावलं विजेतेपद

मुंबई तक

यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवा संघाचा विजयरथ यशस्वी कामगिरी करुन भारतात परतणार आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १९० धावांचं आव्हान भारताने आश्वासक खेळ करुन पूर्ण केलं. U-19 वर्ल्डकपच्या इतिहासातलं भारताचं हे विक्रमी पाचवं विजेतेपद ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवा संघाचा विजयरथ यशस्वी कामगिरी करुन भारतात परतणार आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १९० धावांचं आव्हान भारताने आश्वासक खेळ करुन पूर्ण केलं. U-19 वर्ल्डकपच्या इतिहासातलं भारताचं हे विक्रमी पाचवं विजेतेपद ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाहीये.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी, आयर्लंडवर १७४ धावांनी, युगांडावर ३२६ धावांनी, बांगलादेशवर ५ धावांनी आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवला होता. हीच विजयी परंपरा भारताच्या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यातही कायम राखली.

गोलंदाजीत आश्वासक कामगिरी केल्यानंतर भारतीय डावाची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर रघुवंशी भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर हर्नुर सिंग आणि उप-कर्णधार शेख रशिद यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. हर्नुर सिंगला आऊट करत इंग्लंडने भारताला दुसरा धक्का दिला. यानंतर शेख रशिदने कर्णधार यश धुलच्या साथीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. यादरम्यान शेख रशिदने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp