T20 World Cup : टीम इंडियाला विजयी सूर गवसला, अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अखेरीस विजयी सूर गवसला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात करत, उपांत्य फेरीतल्या प्रवेशाची आशा कायम ठेवली आहे. पहिल्यांदा बॅटींग करताना भारताने रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर २१० धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १४४ […]
ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अखेरीस विजयी सूर गवसला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात करत, उपांत्य फेरीतल्या प्रवेशाची आशा कायम ठेवली आहे.
पहिल्यांदा बॅटींग करताना भारताने रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर २१० धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १४४ धावांपर्यंत मजल मारु शकला.
टॉस जिंकून अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने सामन्यात दोन बदल करत सूर्यकुमार यादव आणि आश्विनला संघात स्थान दिलं. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानने ही जोडी फोडण्याचे आतोनात प्रयत्न केले, अखेरीस १५ व्या ओव्हरमध्ये त्यांना यश मिळालं.
करीम जनातने रोहित शर्माला ७४ धावांवर आऊट केलं. रोहितने आपल्या इनिंगमध्ये ८ फोर आणि ३ सिक्स लगावल्या. यानंतर लोकेश राहुलही अर्धशतक झळकावून गुलबदीन नैबच्या बॉलिंगवर आऊट झाला. राहुलने ४८ बॉलमध्ये ६ फोर आणि २ सिक्स लगावत ६९ रन्स केल्या. यानंतर कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला फलंदाजीत प्रमोशन दिलं. या दोन्ही फलंदाजांनीही कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत चौफेर फटकेबाजी करत संघाला २०० पारचा टप्पा गाठून दिला.