Sharad Pawar on BJP : गेल्या काही वर्षांपासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता, राजकीय पक्षांच्या युत्या आणि आघाड्यांनी जनतेला अनेकदा धक्के दिले. त्यानंतर फुटलेल्या दोन गटांच्या नेत्यांच्या होणाऱ्या भेटीगाठी भुवया उंचावणाऱ्या ठरतात. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर टोकाची टीका झालेली दिसली. त्यानंतर गेल्या काही काळापासून दोन्ही नेत्यांच्या होणाऱ्या भेटी चर्चेचा विषय होता. मात्र, शरद पवार यांनी आता या चर्चांना ब्रेक लावलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मोठी बातमी: अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान शेवटच्या क्षणी रद्द, नेमकं काय घडलं?
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अनेकदा भेटी झाल्या. वेगवेगळ्या राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही नेते एकत्र आल्याचं दिसलं. मध्यंतरी काहीवेळा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असून, ते एकत्र येतील अशाही वावड्या उठल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी या विषयावर पडता टाकला आहे. भाजपसोबत जाण्याचा विचार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "भाषण करताना कुणी तरी सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता करायचे कारण नाही..पण सगळे म्हणजे कोण...गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार...फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार....आणि हे सगळे असतील तर मला मान्य आहे" असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा >> महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई
भाजपबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना पवार पुढे म्हणाले, "सत्तेसाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं हा काँग्रेसचा विचार नाही, त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे संधीसाधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही, त्या दृष्टीकोनातून आपल्याला पावलं टाकायचीत." असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
