मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असला तरी आता येणारे काही दिवस राज्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
सध्या बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार झाले असून तेथे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. ही प्रणाली ओडिशा किनारपट्टीजवळ अधिक सक्रिय होत असून तिची वाटचाल पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशेकडे होण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा>> Govt Jobs : सरकारी बँकेत पदवीधरांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज
हवामान तज्ज्ञांच्या मते, ही प्रणाली मध्य भारताच्या दिशेने सरकत असताना अरबी समुद्रातील दमट वाऱ्यांशी तिचा संबंध येईल. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्या पावसाची शक्यता
हवामानाशी संबंधित संस्थांनीही पुढील काही दिवस मॉन्सून अधिक सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम मध्य भारत आणि महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो.
हे ही वाचा>> Govt Jobs : इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, काय आहेत निकष? जाणून घ्या सविस्तर
विशेषतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेक भागांमध्ये समाधानकारक ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
28 जुलैसाठीचा अलर्ट
मंगळवारसाठी (28 जुलै) हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट:
- चंद्रपूर
- गडचिरोली
- गोंदिया
- यलो अलर्ट:
- नागपूर
- भंडारा
- वर्धा
- यवतमाळ
- पुणे घाट परिसर
- सातारा घाट परिसर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
राज्यातील इतर अनेक भागांसाठी मात्र कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
29 जुलैसाठीचा अलर्ट
बुधवारी (29 जुलै) काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट:
- नागपूर
- वर्धा
- चंद्रपूर
- भंडारा
यलो अलर्ट:
- धुळे
- जळगाव
- छत्रपती संभाजीनगर
- जालना
- बुलढाणा
- अकोला
- अमरावती
- वाशिम
- हिंगोली
- परभणी
- लातूर
- नांदेड
- यवतमाळ
- गोंदिया
- गडचिरोली
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
याशिवाय कोकणातील बहुतांश भागातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
30 जुलैसाठीचा अलर्ट
गुरुवारी (30 जुलै) सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट:
- सातारा घाट परिसर
यलो अलर्ट:
- गडचिरोली
- चंद्रपूर
- वर्धा
- अमरावती
- हिंगोली
- नांदेड
- परभणी
- जालना
- जळगाव
- छत्रपती संभाजीनगर
- बीड
- अहिल्यानगर
- नाशिक
- नाशिक घाट परिसर
- धुळे
- नंदुरबार
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- कोल्हापूर घाट परिसर
महाराष्ट्रात पावसाचा जोर का वाढणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत मध्य भारतात प्रवेश करेल. त्याचवेळी अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमट वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने दोन्ही हवामान प्रणालींचा प्रभाव राज्यावर पडण्याची शक्यता आहे.
यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. ज्या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची कमतरता होती, त्या भागांनाही या नव्या प्रणालीचा फायदा होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT












