हनिमून झाला अन् पत्नी प्रेमाने म्हणाली, 'अहो तुम्ही झोपा...' नव्या नवरीने केला भलताच कांड

लग्नाच्या पहिल्या रात्री हनीमून साजरा केल्यानंतर बायकोने अगदी प्रेमाने नवऱ्याला झोपायला सांगितलं. नवऱ्याचा डोळा लागताच बायकोने असं काही तरी केलं, ज्याने सगळेच चकित झाले. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.

हनिमून झाला अन् पत्नी प्रेमाने म्हणाली, 'अहो तुम्ही झोपा...' नव्या नवरीने केला भलताच कांड

हनिमून झाला अन् पत्नी प्रेमाने म्हणाली, 'अहो तुम्ही झोपा...' नव्या नवरीने केला भलताच कांड

मुंबई तक

• 04:35 PM • 27 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हनीमून झाल्यानंतर नवरीने भलतंच केलं..

point

सकाळी उठल्यानंतर नवऱ्याला धक्काच बसला

point

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

UP News: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातून सर्वांनाच चकित करुन सोडणारी बातमी समोर आली आहे. धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर नवरी आपल्या नवऱ्यासोबत सासरी गेली. त्यानंतर नवरीचं सासरी छान स्वागत देखील करण्यात आलं. लग्नाच्या सगळ्या विधी पार पाडल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने चांगलाच कांड केल्याची बातमी समोर आली. खरंतर, लग्नाच्या पहिल्या रात्री हनीमून साजरा केल्यानंतर बायकोने अगदी प्रेमाने नवऱ्याला झोपायला सांगितलं. नवऱ्याचा डोळा लागताच बायकोने असं काही तरी केलं, ज्याने सगळेच चकित झाले. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया. 

हे वाचलं का?

हनीमून साजरा केल्यानंतर नवरा शांत झोपला आणि सकाळी त्याचा डोळा उघडताच त्याला मोठा धक्का बसला आणि तो जोरात ओरडला. नवऱ्याच्या आई-वडिलांसोबत कुटुंबातील सगळेच सदस्य नवऱ्याच्या खोलीत गेले आणि घडलेली घटना पाहिल्यानंतर ते सुद्धा अगदी चकित झाले. ही घटना कस्बा सादाबादमध्ये घडल्याची माहिती समोर आली. लग्नानंतर हनीमूनच्या दुसऱ्या दिवशीच नवरी तिच्या सासरच्या घरातून दोन लाख रुपये घेऊन पळून गेली. 

आता सासरची मंडळी फरार झालेली नवरी आणि लग्न जुळवून देणाऱ्या एजन्टच्या शोधात आहेत. परिसरात सर्वत्र या लग्नाच्या चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, कस्बा सादाबादचा रहिवासी असलेल्या एका तरुणाचं लग्न झारखंडच्या एका मुलीसोबत ठरलं. एका एजंटच्या माध्यमातून हे लग्न जुळवण्यात आलं होतं. दोन्ही पक्षांच्या समंतीने लग्नाचा मुहूर्तसुद्धा निश्चित करण्यात आला होता. त्यावेळी लग्न समारंभ सादाबादमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: काय सांगता... खरं की काय? मुंबईकरांना चक्क स्वस्तात मिळणार वीज?

24 जून रोजी घडली घटना

ठरवलेल्या कार्यक्रमानुसार, कस्बाच्या एका मॅरेज होममध्ये 23 जून रोजी लग्नाचा समारंभ मोठ्या थाटात पार पडला. नवरीची पाठवणी करुन ती सासरी गेली. मात्र, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 जून रोजी नवरी पळून गेल्याचं समोर आलं. सकाळी घरातील इतर सदस्यांना जाग आल्यानंतर नवरी घरात नव्हतीच. या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. घरातल्या सदस्यांनी तपास देखील केला मात्र त्यांच्या कोणताच पुरावा त्यांच्या हाती लागला नाही. 

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी सुवर्णसंधी! कसं आणि कधीपर्यंत कराल अप्लाय?

नवरी आणि एजंटचा तपास 

सासरहून पळून जाताना नवरीने घरातून 2 लाख रुपये घेऊन गेल्याचं सांगितलं जात आहे. समाजाच्या लाजेमुळे पीडित कुटुंबियांनी पोलीसात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. सध्या सासरची मंडळी त्यांच्या परीने दोघांचा तपास करत आहेत.

 

    follow whatsapp