अनेकजण रोज किंवा आठवड्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसोबत होणाऱ्या अपघातांच्या वेगवेगळ्या घटना कानावर पडत असतात. मात्र, बुधवारी शिवपुरीमध्ये घडलेल्या एका घटनेनं देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय.बुधवारी रात्री एका नवविवाहितेचा चलती रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पतीने तातडीने रेल्वेची चेन ओढून रेल्वे थांबवली आणि सुमारे एक किलोमीटर मागे जाऊन आपल्या पत्नीला शोधलं. मात्र, तोपर्यंत पत्नीचा मृत्यू झालेला होता.
ADVERTISEMENT
गावी जायला निघालेल्या जोडप्यावर काळाचा घाला
मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथील रहिवासी असलेल्या वकील विकास जोशी यांचा विवाह 16 एप्रिल 2025 रोजी उरई (जालौन) येथील शिवानी शर्मा यांच्याशी झाला होता. शिवानी एलएलबीची विद्यार्थिनी होती आणि नुकतीच ती परीक्षा देण्यासाठी पतीसह उरईला गेली होती. परीक्षा संपल्यानंतर मंगळवारी, 27 मे रोजी दोघे ग्वालियरला परतले आणि बुधवारी सायंकाळी इंदौरला जाण्यासाठी रेल्वेने निघाले. विकास हे इंदौर येथे वकिली करतात आणि तिथेच राहतात.
हे ही वाचा >> शिंदेंच्या पठ्ठ्यानं स्वत:च्याच गाडीवर करवून घेतला गोळीबार, युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाचा डाव काय होता?
उलटी करण्यासाठी रेल्वेच्या दारात गेलेल्या पत्नीसोबत घात झाला....
बुधवारी रात्री सुमारे 9 वाजता, जेव्हा दोघे रेल्वेने इंदौरला जात होते, तेव्हा शिवपुरी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शिवानीला मळमळ होऊ लागली. त्यावेळी ती कोचच्या दाराजवळ गेली. त्याचवेळी विकास पाणी आणण्यासाठी गेला होता. जेव्हा तो परत आला, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका तरुणानं सांगितले की, शिवानीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. हे ऐकताच विकासने तातडीने रेल्वेची चेन ओढली आणि खाली उडी मारली.
मोबाईलच्या उजेडात पत्नीला शोधलं...
विकासने गाडी थांबवेपर्यंत गाडी एक किलोमीटर पुढे गेली होती. त्यानं अंधारात टॉर्चच्या प्रकाशात आपल्या पत्नीचा शोध घेतला आणि रातौर क्रॉसिंगजवळ त्याला पत्नीचा दिसली. त्याने तिला उचलून रस्त्यावर आणलं. तिथे एका कार चालकाने मदत केली आणि दोघांना जिल्हा रुग्णालयात पोहोचवलं. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. कोतवाली पोलिसांनी मर्ग नोंदवून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा >> विवाहित महिलेचा 'दृष्यम 2' प्लॅन फसला! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी थेट मृतदेहच..त्या रात्री काय घडलं?
विकासने सांगितले की, घटनेची माहिती देऊनही जीआरपीने कोणतीही मदत केली नाही. अंधारात टॉर्चच्या उजेडात पत्नीला शोधत राहिला. पत्नी सापडल्यानंतर त्याला अर्ध अंतर तिला उचलून चालावं लागले. नंतर जीआरपी कर्मचारी आले आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं. अखेर एका कार चालकाच्या मदतीने तो रुग्णालयात पोहोचवलं.
एसआय सुमित शर्मा यांनी सांगितलं की, शिवानी रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडली. विकास जोशी यांनी ठाण्यात सांगितले की, ते आपल्या पत्नीसह ग्वालियरहून इंदौरला रेल्वेने जात होते. त्यांच्या पत्नीला अचानक मळमळ आणि उलटीची तक्रार झाली, त्यामुळे ती कोचच्या दारापाशी गेली. त्यावेळी विकास पाणी आणण्यासाठी आत गेला होता. नंतर त्यांना समजले की त्यांची पत्नी खाली पडली आहे. रातौर येथे घडलेल्या या घटनेच्या संदर्भात प्रकरण नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
