मानस भित्रा होता की सायको किलर? मेहुणीच्या एन्ट्रीने सगळं उघडं पडलं

मुंबई तक

• 01:55 PM • 30 Aug 2026

Crime News : पत्नी आणि बहिणीची हत्या करून आत्महत्या केलेल्या मानस बाजपेयीच्या कुटुंबीयांकडून परस्परविरोधी विधाने समोर आली आहेत. तर मेहुणीने मानसला मोरुग्ण मारेकरी म्हटलं आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईच्या मृत्यूनंतर नातेसंबंधात दरी निर्माण 

point

मानसला तीन शस्त्रे कशी मिळाली होती?

Crime News : लखनऊ येथे पत्नी दिव्या मिश्रा आणि बहीण शिबाला गोळी घालून हत्या करण्यात आली. नंतर स्वत:च मान वाजपेयी नावाच्या व्यक्तीने जीवन संपवलं. मानस वाजपेयीच्या प्रकरणात मामा अवधेश वाजपेयी, अमोल वाजपेयी आणि मेहुणी प्रज्ञा मिश्राने अनेक खुलासे केलेत. 2017 मध्ये अरेंज मॅरिज करणाऱ्या मानस आणि दिव्याच्या नातेसंबंधात 2019 मध्ये आईच्या निधनानंतर दूरावा निर्माण झाला होता. मानसकडे पिस्तूल कुठून आले या प्रकरणी मामा भयभीत झाला. दिव्याची बहीण प्रज्ञा मिश्राने आरोप केला की, मानस आणि तिच्या बहिणीने मिळून आईला मारहाण केली, नंतर आईची हत्या झाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! नवऱ्यासह मित्राचा महिलेवर अत्याचार, स्मशानभूमीतील भयंकर घटना

आईच्या मृत्यूनंतर नातेसंबंधात दरी निर्माण 

मानसचा मामा अवधेश आणि अमोल वाजपेयीने सांगितलं की, मानस हा खूप घाबरट स्वभावाचा होता. त्याला रात्री निर्जनस्थळी जाण्यास भयंकर भीती वाटायची. तो कुठल्याची वाईट संगतीत नव्हता. कुटुंबीयांनी सांगितलं की, दोघेही चांगले पैसे कमावत होते. त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, दोघेही चांगले काम करत होते. मात्र, 2019 मध्ये आईच्या मृत्यूनंतर त्यांच्यातील नातेसंबंधात दरी निर्माण झाली. एका वर्षानंतर दोघेही विभक्त झाले आणि न्यायालयात त्यांचा खटला सुरू होता. 

मामाच्या माहितीनुसार, आईच्या मृत्यूनंतर मानसची बहीण डिप्रेशनमध्ये गेली होती. मानस तिच्यावर पूर्ण उपचार करत होता. बँकेत असताना देखील तिच्या औषधोपचारावर वेळेवर लक्ष दिले जात होते. आईने अनेकदा औषध न घेतल्याने तिच्यावर रागावणे हा खुनाचा पुरावा नाही. 

मानसला तीन शस्त्रे कशी मिळाली होती?

दरम्यान, प्रज्ञा मिश्रा या व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी विचारलं की, बँक कर्मचारी मानसला तीन शस्त्रे कशी मिळाली होती? तो ऑटो-रिक्षाने आला आणि त्याने खून केला, म्हणून ऑटो-रिक्षा चालकाच्या भूमिकेवर चौकशी होणे गरजेचे आहे. पुढे प्रज्ञा यांनी दावा केला की, कौटुंबिक न्यायालयात मानसचा एका समुपदेशकाशीही वाद निर्माण झाला होता. 

हे ही वाचा : मनोज जरांगेंनी खासदार बंडू जाधवांना दम भरला, फोनवर काय बोलून गेले? VIDEO

प्रज्ञा मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, मानसने घरखर्चाची विभागणी करून एक यादी तयार केली होती, जी दिव्याने स्वीकारली होती. जेव्हा दिव्याने तिच्या वाट्याचचा खर्च देणे थांबवले, तेव्हा मानसला फसवल्याची भावना निर्माण झाली.