चार वर्षाच्या चिमुकलीनं चॉकलेट मागितलं म्हणून बापानं थेट गळा घोटून संपवलं, आई म्हणाली त्याला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी राठोड़ हा दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबात सतत वाद आणि भांडणं होत होती.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 09:56 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये बापानेच मुलीला संपवलं

point

चार वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचा हट्ट भोवला

point

जन्मदात्या बापानं गळा घोटून संपवलं

लातूर : सांगलीत नीट परीक्षेच्या चाचणीत कमी मार्क पडल्यानं बापानं लेकीला संपवल्याची घटना ताजीच आहे. अशातच पुन्हा लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये एक चीड आणणारा प्रकार घडला आहे. उदगीरमधील भीमा तांडा येथे एका व्यसनाधीन पित्यानं आपल्या चार वर्षीय मुलीची चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागातून गळा दाबून हत्या घटना घडली आहे. ही क्रूर घटना रविवारी (29 जून 2025) दुपारी घडली असून, आरोपी पिता बालाजी राठोड याला पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>टेक्नॉलॉजी वापरुन लोकांना गंडवलं, भक्तांच्या मोबाईलमधून मिळवायचा 'ती' माहिती, नशेच्या गोळ्या देऊन...

व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी राठोड हा दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबात सतत वाद आणि भांडणं होत होती. या सततच्या तणावामुळे त्याची बायको वर्षा हिने त्याला सोडून आपल्या वडिलांकडे राहण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांची चार वर्षांची मुलगी आरुषी ही वडिलांसोबत राहत होती. रविवारी दुपारी, आरुषीने आपल्या वडिलांकडे,  चॉकलेट घेण्यासाठी पैसे मागितले. हा छोटासा हट्ट राठोडला एवढा खटकला की, त्यानं रागाच्या भरात साडीनं आपल्या मुलीचा गळा आवळला आणि तिची निर्घृण हत्या केली.

आई म्हणाली त्याला फाशी द्या...

दरम्यान, पतीनं केलेल्या अमानुष कृत्यामुळे संतप्त झालेल्या आरुषीची आई वर्षा यांनी आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बालाजी राठोडला त्याच्या या कृत्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी आईने केली आहे. वर्षा यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली प्राथमिकी (FIR) नोंदवली असून, राठोड़ला तात्काळ अटक करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे ही वाचा >>मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची कंत्राटदाराची धमकी

बालाजी राठोडच्या दारूच्या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्याच्या व्यसनाचा परिणाम त्याच्या पत्नी आणि मुलीवर होत होता. पत्नी वर्षा यांनी यापूर्वीच पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता, पण मुलगी आरुषी वडिलांसोबत राहत होती. बालाजी राठोडनं केलेल्या या कृत्यामुळे गावात संतापाचं वातावरण आहे. 

    follow whatsapp