Mumbai Local News : धावत्या लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आलीये. नारळ डोक्याला लागल्याने तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, या तरुणाचा मृत्यू झालाय. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढील 24 तास धोक्याचे, रेड अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस बरसणार!
पूलावरुन जात असताना नारळ डोक्याला लागला
अधिकची माहिती अशी की, संजय भोईर नायगावच्या पाणूज बेटावर राहतो. तो शनिवारी सकाळी घरातून साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्याने नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते. दरम्यान, हवामान खराब असल्याने संजय भोईर याने मुंबईला कामावर जाण्यासाठी त्याने भाईंदर खाडीवरील ब्रीजवरुन नायगाव स्टेशन गाठण्याच ठरवलं. पूलावरुन चालत असताना चालू लोकलमधून एका प्रवाशाने नारळ फेकला. तोच नारळ संजयच्या डोक्याला लागला.
हेही वाचा : Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!
संजय भोईरचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, नारळ डोक्याला लागल्यामुळे संजय अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना इतर प्रवाशांनी पाहिल्यानंतर संजयच्या घरच्यांना बोलावण्यात आलं होतं. संजयच्या घरच्यांनी त्याला प्रथम महानगर पालिकेच्या रुग्णालयात हलवलं. तिथून त्याला वसईच्या प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात शिफ्ट केलं होतं. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृत संजय गोरेगावला एका खासगी कंपनीत काम करत होता. बोट असल्यामुळे अनेकदा नागरीकांना या ब्रीजवरुन जीवघेणा प्रवास करावा लागतो.आजवर या गावात किमान 10 ते 12 घटना घडल्या असल्याची माहिती गावच्या सरपंचांनी दिली.
Beed Flood : एक एकराची शेती त्यातही अस्मानी संकट, अखेर शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT
