अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाचं भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी मान्यता दिली आहे. या प्रकरणात त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याच्यावर 2008 मध्ये भारतातील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. भारताने अमेरिकन सुरक्षा यंत्रणांना याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आलं होतं. भारताने दिलेले पुरावे न्यायालयाने स्वीकारले. भारताने दिलेल्या कागदपत्रात 26/11 हल्ल्यातील तहव्वुरची भूमिका नमूद करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Unified Pension Scheme : 1 एप्रिलपासून लागू होणार UPS, अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या प्रकरणातील महत्वाचा सुत्रधार म्हणून भारताकडून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जात होती. यापूर्वी, सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नॉर्दर्न सर्किटसह अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाईमध्ये राणा हारला होता. 13 नोव्हेंबर रोजी तहव्वुर राणा यांने या प्रकरणाच्या पुनर्विचारासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. तहव्वुर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे.
हे ही वाचा >> Thane : प्राचार्याकडूनच कॉलेजमधील महिला शिक्षकांचा लैंगिक शोषण, मनसेनं चोप दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल
आता या मुद्द्यांवर राजकीय मंडळीच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. तहव्वुर राणाला अमेरिका भारतात पाठवेल, ही चांगली गोष्ट आहे पण दाऊद, मेहुल चौक्सी आणि नीरव मोदी यांना कधी परत आणले जाईल?" राऊत पुढे म्हणाले, आता भाजप असा कार्यक्रम आयोजित करेल की आम्ही तहव्वुर राणा आणला. पण पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमलाही आणावं, छोटा शकीलला आणावं असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
