यवतमाळ : एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांवर ज्वलनशील द्रव्याने हल्ला

मुंबई तक

• 09:37 AM • 28 Dec 2021

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील मोमीनपुरा भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय मुलावर एका अज्ञात व्यक्तीने ज्वलवनशील पदार्थ टाकून हल्ला केला आहे. सोमवारी संध्याकाळी पावणे पाच वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या तीन दिवसांत या भागात अशाच पद्धतीने तीन मुलांवर ज्वलनशील द्रव्य टाकून हल्ले करण्यात आले. ही तिन्ही मुलं ही एकाच […]

Mumbaitak
follow google news

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील मोमीनपुरा भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय मुलावर एका अज्ञात व्यक्तीने ज्वलवनशील पदार्थ टाकून हल्ला केला आहे. सोमवारी संध्याकाळी पावणे पाच वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या तीन दिवसांत या भागात अशाच पद्धतीने तीन मुलांवर ज्वलनशील द्रव्य टाकून हल्ले करण्यात आले. ही तिन्ही मुलं ही एकाच कुटुंबातील असल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

नुकत्यात ज्या मुलावर हल्ला करण्यात आला तो बॅटरीमधील पाण्याने केल्याचं समोर आलं. अशरखान इनायत खान (वय ५) हा आपल्या परिवारासह मोमीनपुरा भागात राहतो. सोमवारी संध्याकाळी हा मुलगा आपल्या घरासमोर खेळत असताना एक अज्ञात व्यक्ती आपल्या दुचाकीने तिकडे आली आणि त्याने ज्वलनशील द्रव्याने अशरखानवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने तात्काळ त्या जागेवरुन पळ काढला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहतच तपासाला सुरुवात केली आहे.

मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे आपल्या परिवारासह राहतात. ते मजुरीचे काम करतात. त्यांना एक मुलगा उझेब (वय ८) व मुलगी अश्फानाझ (वय ५) आहेत. शनिवारी त्यांच्या मुलावर व रविवारी त्यांच्या मुलीवर घराजवळ खेळत असताना असाच हल्ला करण्यात आला होता. पहिल्या घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले मात्र सलग दुसरा हल्ला झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. तपासणी केली असता सदर द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले. या दोन घटनेनंतर खळबळ माजली असताना आज शफीउल्ला यांच्या लहान भावाच्या मुलावर हल्ला झाला.

Crime: अवघ्या 3 वर्षाच्या पुतणीची काकूने केली हत्या, 5 दिवस मृतदेह ठेवलेला गव्हाच्या कोठीत

या तिन्ही हल्ल्यात कोणतीही जखम झाली नसली तरी चेह-यावर जळजळ होत आहे। सदर घटनेमुळे संपूर्ण मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण वणी दहशतीत आली आहे. सध्या या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. दरम्यान पीडितांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले असून याबाबत तक्रार नोंदवणे सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे.

    follow whatsapp