अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सरकारी नोकरी सोडून गाठली मुंबई, असा मिळाला पहिला रोल

मुंबई तक

• 08:46 AM • 04 Aug 2022

बॉलिवूड अॅक्टर मिथिलेश चौधरी यांचं निधन झालं आहे. ६८ वर्षीय मिथिलेश चौधरी यांचा हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. त्यांचे चाहते आणि सहकारी सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत. मुंबईत कसे आले होते मिथिलेश चतुर्वेदी? लखनऊमध्ये राहणारे मिथिलेश चतुर्वेदी हे सर्वसामान्य […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अॅक्टर मिथिलेश चौधरी यांचं निधन झालं आहे. ६८ वर्षीय मिथिलेश चौधरी यांचा हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. त्यांचे चाहते आणि सहकारी सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत.

हे वाचलं का?

मुंबईत कसे आले होते मिथिलेश चतुर्वेदी?

लखनऊमध्ये राहणारे मिथिलेश चतुर्वेदी हे सर्वसामान्य माणूस होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात खूप उशिरा केली. मुंबईत येण्याआधी ते थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तसंच दीर्घकाळ त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणूनही काम केलं. मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली होती.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मिथिलेश चतुर्वेदी यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांचं सिनेमातलं करिअर काहीसं उशिरा सुरू केलं. मी नाटक करत असे, नाटक करता करता मी देशभरात फिरलो. नद्या असलेली शहरं तर आपण पाहिली आता समुद्र असलेल्या मुंबईत यावं असं वाटलं म्हणून मुंबईत आलो. इथे आल्यानंतर काम मिळवणं खूपच कठीण होतं. पण मी देवाचं नाव घ्यायचो आणि प्रयत्न करायचो, देवाने माझी प्रार्थना ऐकली असं मिथिलेश यांनी सांगितल होतं.

मी थिएटरमध्ये काम करत असतानाच सरकारी नोकरीही करत होतो. जवळपास २५ वर्षे मी सरकारी नोकरी केली. जेव्हा लक्षात आलं की नोकरीशिवायही आपलं भागतं आहे तेव्हा नोकरी सोडली आणि मुंबईला आलो. त्यावेळी मी काहीसा घाबरलोही होतो. पण मला देवावर विश्वास होता असंही मिथिलेश यांनी सांगितलं होतं.

मिथिलेश चतुर्वेदी यांना पहिला रोल कसा मिळाला?

मिथिलेश यांची पहिली सीरीयल उसूल होती. त्यामध्ये डॅनीसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. असा रोल मला नंतर परत मिळाला नाही. त्यानंतर सत्या सिनेमात काम केलं, भाई भाई सिनेमात काम केलं. त्यानंतर मग काम करत राहिलो. मात्र जास्त सिनेमांमध्ये काम करू शकलो नाही कारण माझा पीआर भगवान भरोसे चालतो. देवाने काम दिलं सिनेमासाठी तर मी करतो कारण मी आळशी आहे असंही मिथिलेश यांनी सांगितलं होतं.

मिथिलेश चतुर्वेदी यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटामधून पदार्पण केलं. त्यानंतर सत्या, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, बंटी और बबली, कृष, रेडी, गदर: एक प्रेम कथा, कोई मिल गया आणि गांधी माय फादर यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी कोई मिल गया आणि क्रेजी 4 या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. मिथिलेश चतुर्वेदी यांनी मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केलं. पटियाला बेब्स या मालिकेमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच गुलाबो-सिताबों या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp