अमृता फडणवीस म्हणाल्या… ‘ए भाई, तू कोण पण असशील!’

मुंबई: ‘ए भाई तू जो कोण असशील- माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचं ट्विट करताना केलेला एकेरी उल्लेख यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे आमदार भाई जगताप एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:49 AM • 23 Mar 2021

follow google news

मुंबई: ‘ए भाई तू जो कोण असशील- माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचं ट्विट करताना केलेला एकेरी उल्लेख यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलं का?

काँग्रेसचे आमदार भाई जगताप एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री असताना पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली होती? त्यावेळी यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस ह्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

याबाबत अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ए भाई, तू जो कोण असशील माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक‘ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय! अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला. सध्या अमृता फडणवीस यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस या सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. कोरोना सेंटर्समध्ये भ्रष्टाचार, सचिन वाझे या प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरु ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पण यावेळेस मात्र त्यांनी थेट काँग्रेसच्या एका आमदाराला टार्गेट केलं आहे.

Sachin Vaze प्रकरणावरून अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाल्या…

नेमकं प्रकरण काय?

2014 साली राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांनी राज्यातील पोलीस दलातील अनेकांची पगाराची खाती ही स्टेट बँक ऑफ इंडियामधून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आले होते. त्यावेळी या मुद्द्यावरुन विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं.

कारण की, अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उच्च पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे या घटनेचा संबंध त्यांच्याशी जोडला गेला होता. महाराष्ट्रात साधारण दोन लाखाहून अधिक पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगाराचा आकडा हा मोठा आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या मुद्द्यावरुन फडणवीस यांनी वारंवार टार्गेट केलं होतं.

Women’s Day Special: अमृता फडणवीस म्हणतात, ट्रोलर्सना मी का घाबरू?

त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी असं स्पष्टीकरण दिलं होतं की, ‘अॅक्सिस बँक आणि सरकारी खात्याशी संबंधित कोणत्या बँकांची निवड केली मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनेच केली होती. पण माझी पत्नी अॅक्सिस बँकेतच काम करत असल्याने ते माझी आणि माझ्या सरकारची बदनामी करु शकतात. पण तसं होऊ शकत नाही. यासंबंधी माझ्या माझ्या पत्नीने कधीही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची भेट घेतलेली नाही.’ असं फडणवीस म्हणाले होते.