मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला

मुंबई तक

• 02:26 AM • 10 Nov 2021

क्रूझ पार्टी प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. या प्रकरणात मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. त्यामुळे आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलं आहे. मलिकांकडून होत असलेल्या आरोपांवरून अमृता फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे. समीर […]

Mumbaitak
follow google news

क्रूझ पार्टी प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. या प्रकरणात मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. त्यामुळे आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलं आहे. मलिकांकडून होत असलेल्या आरोपांवरून अमृता फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एनसीबीच्या काही कारवायांबद्दल नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर या मागे भाजप असल्याचा आरोपही त्यांच्याकडून होत असून, माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी ‘बॉम्ब’ फोडला, नवाब मलिकांवरचे ‘ते’ आरोप जसेच्या तसे

त्यानंतर मंगळवारी (9 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं आणि त्यांनी स्वस्तात भुखंड घेतल्याचा आरोप केला. त्याला मलिक यांनी उत्तर दिलं असून, दोन्ही नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर अमृता फडणवीसांनी ट्वीट करत मलिकांवर निशाणा साधला.

अमृता फडणवीस ट्वीटमध्ये काय म्हणाल्या?

“नवाब मलिकांनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेतल्या. पण प्रत्येकवेळी खोटं आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीचं आपल्याला ऐकवल्या. त्यांचा जावई आणि काळी कमाई वाचवणं हे एकच त्यांचं लक्ष्य आहे”, असं अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.

मलिकांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव हटवलं; अमृता फडणवीस म्हणतात…

रिव्हर थीम साँगवरून मलिकांनी केले होते आरोप

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मुंबईतील नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्याला जयदीप राणाने पैसे पुरवल्याचं मलिकांनी म्हटलं होतं. जयदीप राणा ड्रग्ज प्रकरणात तुरूंगात असून, त्याचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता.

    follow whatsapp