उच्चभ्रू ‘लोढा’ सोसायटीतील घर फोडून चोरट्यांनी तब्बल साडेचार लाखांचे दागिने पळवले!

मुंबई तक

• 12:55 PM • 21 Oct 2021

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली नवरात्री उत्सवानिमित्त गावी गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घरात चक्क 4 लाख 50 हजारांच्या मुद्देमालाची चोरी  झाली आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी गावातील लोढा ऑर्चिड या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. लोढा ऑर्चिडमधील झा कुटुंबीयांच्या घरी चोरटयांनी अत्यंत धाडसी असा दरोडा टाकला. चक्क प्रसाधनगृहाला असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

हे वाचलं का?

नवरात्री उत्सवानिमित्त गावी गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घरात चक्क 4 लाख 50 हजारांच्या मुद्देमालाची चोरी  झाली आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी गावातील लोढा ऑर्चिड या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

लोढा ऑर्चिडमधील झा कुटुंबीयांच्या घरी चोरटयांनी अत्यंत धाडसी असा दरोडा टाकला. चक्क प्रसाधनगृहाला असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यावेळी तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला आहे. तर काही रोख रक्कमही चोरी केल्याची माहिती अंकित झा यांचे मित्र महेश ठोंबरे यांनी दिली.

या घरफोडीबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी आता तपास चालू केला आहे.

कल्याण ग्रामीण भागात सध्या मोठे-मोठे गृहसंकुलांचे प्रकल्प सध्या पूर्णत्वास येत आहेत. तळोजा, पनवेल आणि नवी-मुंबई जवळ असल्याने अनेक जण हे खोणी गावाजवळील संकुलाच्या प्रकल्पात घर घेत आहेत. मात्र, या परिसरात पोलीस स्टेशन नसल्याने चोरटे रेकी करून हात साफ करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या लोढा ऑर्चिड मधील सी-207 मध्ये राहणाऱ्या अंकित झा यांच्या घरी चोरी झाली आहे. झा कुटुंबीय नवरात्रीनिमित्त गावाला गेले होते. याच गोष्टीचा फायदा घेत चोरटयांनी प्रसाधनगृहाच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला आणि साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केला.

अंकित हे बुधवारी आपल्या कुटुंबीयांसह घरी आले असता चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याला याची माहिती देत तक्रार दाखल केली.

तब्बल 31 मोबाइलसह चोरट्याला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी देखील या संदर्भात तातडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, इतक्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरटयांनी प्रवेश केलाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या संपूर्ण परिसरात खासगी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात असते.

सध्या ग्रामीण भागात चोरटयांनी आपले जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अश्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

    follow whatsapp