विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई तक

• 03:01 PM • 04 Mar 2021

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

हे वाचलं का?

पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती

भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी नितीन तेलवणे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४-अ, ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bjp corporator from murbad in thane district arrested for allegedly molesting woman)

जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी काय म्हणाले गृहमंत्री

दरम्यान, जळगाव येथील महिला वसतीगृहात तरुणींना कपडे काढून पोलिसांनी त्यांना नृत्य करण्यास भाग पाडलं असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. मात्र, याप्रकरणी आज (4 मार्च) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती देताना असं म्हटलं की, पोलिसांवरील आरोपात काहीही तथ्य नाही.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी माझी व माझ्या समाजाची बदनामी-संजय राठोड

‘महिलांचं वसतीगृह असल्याने तिथे एकही पोलीस कर्मचारी आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये देखील एकही पोलीस अधिकारी आत गेल्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिसांवर जे आरोप करण्यात येत आहे त्यात काहीही तथ्य नाही. तशा प्रकारचा अहवाल महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.’ अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली

सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप केले जात आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणानंतर सरकारला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं म्हणत भाजपने गेल्या काही दिवसात सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सगळ्या दरम्यान, खुद्द गृहमंत्र्याने भाजपच्या नगरसेवकाला विनयभंगप्रकरणी अटक केल्याची माहिती दिल्यानंतर आता यावरुन अधिक राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे.

    follow whatsapp