Vidhan Parishad – भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत यांची शेवटल्या क्षणी माघार

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप पुस्कृत उमेदावर म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी तो अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. भाजपने कुणाला उमेदवारी दिली आहे? प्रवीण दरेकर राम […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:07 AM • 13 Jun 2022

follow google news

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप पुस्कृत उमेदावर म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी तो अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे.

हे वाचलं का?

भाजपने कुणाला उमेदवारी दिली आहे?

प्रवीण दरेकर

राम शिंदे

श्रीकांत भारतीय

उमा खापरे

रामराजे निंबाळकर तसंच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे याना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने सचिन आहिर आणि आमशा पाडवी या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे देखील भाजपकडून उमेदवारी मिळालेले नेते होते मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी नाव मागे घेतलं आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या निवडणुकीत सरकारला समर्थन देणाऱ्या सहा अपक्ष आमदारांची मतं फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत काय होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितलं असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक झाल्यास राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ये तो झंकी है 20 तारीख अभी बाकी है असं म्हणत दावा केला आहे की, विधानपरिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांनी म्हटलं की, राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल. उद्या अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. मत दाखवून निवडणूक होती त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान असल्याने प्रतिसाद जास्त मिळेल हेदेखील त्यांनी म्हटलंय.

    follow whatsapp