“देवेंद्र फडणवीस स्पायडर मॅन आहेत का?” सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून नाना पटोलेंचा टोला

मुंबई तक

28 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:48 AM)

राज्य सरकारकडून राज्यभरातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना नाना पटोलेंनी चक्क स्पायडरमॅनशी केली आहे. काय म्हटलं आहे नाना पटोले यांनी? शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

राज्य सरकारकडून राज्यभरातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना नाना पटोलेंनी चक्क स्पायडरमॅनशी केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे नाना पटोले यांनी?

शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहेत का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार ? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.

अनेक जिल्ह्यातल्या रस्त्यांची अवस्था वाईट

आधीच या सरकारने मंजूर विकास कामांना स्थगिती दिलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत. रस्त्यात खड्डे आहेत, का खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले, सोयाबीन गेले, भाजीपाला, फळबागा, सर्व काही वाया गेले असतानाही पंचनामे व्यवस्थित केलेले नाहीत. अमरावती, अकोला, यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यातील परिस्थिती मी पाहिली पण सरकारची उदासिनता दिसून येते. शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेले नाही. राज्यातील ईडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सहभाग वाढवू…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यातील ही पदयात्रा जाणार आहे, त्या भागातूनही मोठ्या संख्येने लोक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. डावे पक्ष, सामाजिक संघटना यांनी पदयात्रेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केलेले आहे. भाजपासोडून इतर पक्षांनाही या पदयात्रेसाठी बोलावण्याचा आमचा प्रयत्न. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. सर्व जाती- धर्माच्या लोकांना एकत्र करून देश, लोकशाही व संविधान वाचवणे हा या यात्रेचा संकल्प आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत असून सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन इमामांची भेट घेऊन आले, रामदेवबाबांनीसुद्धा या यात्रेचे स्वागत केले असून हा बदल चांगला आहे.

राहुल गांधी यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे त्यामुळेच लोकांचा पाठिंबा वाढत आहे. पणकाही विकृत मनोवृत्तीचे लोक पदयात्रेला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश येणार नाही. जे लोक यात्रेमुळे घाबरलेले आहेत ते जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाविषयी व पक्षातील काही नेत्यांबद्दल अफवा पसरवत आहेत. महाराष्ट्र ही पदयात्रा सर्वात मोठी व्हाही यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जाणार आहे.

    follow whatsapp