एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे मोबाईल टॅप केले जायचे?; मुख्यमंत्र्यांचा नवा गौप्यस्फोट

मुंबई तक

• 11:02 AM • 25 Sep 2022

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. भाजपसोबत सरकारही स्थापन केलंय. या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका करताना आणि आव्हान देताना दिसाहेत, पण आता शिंदेंनी नवा गौप्यस्फोट केलाय. आपले महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे फोन टॅप केले जात […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. भाजपसोबत सरकारही स्थापन केलंय. या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका करताना आणि आव्हान देताना दिसाहेत, पण आता शिंदेंनी नवा गौप्यस्फोट केलाय. आपले महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे फोन टॅप केले जात होते, असा दावा शिंदेंनी केलाय.

हे वाचलं का?

शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंकडून विधानसभेत आणि सार्वजनिक सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले गेलेत. भाजपनं २०१४ मध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण मला द्यावं लागेल म्हणून घेतलं नाही, असं वारंवार एकनाथ शिंदे सांगतात.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाण्याला विरोध असूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली, असंही एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून सातत्यानं सांगितलं जातंय. याच आरोपांच्या मालिकेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नवा आरोप केलाय. लोकसत्ता दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी हा गौप्यस्फोट केलाय.

“लाज वाटायला पाहिजे, बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली” : तानाजी सावंत

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील फोन संभाषण व्हायचं टॅप?

‘विधानसभेतल्या भाषणात तुम्ही सांगितलं होतं की, तुमच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रात्री-अपरात्री बैठका व्हायच्या. याबद्दल राज्यातील जनतेला प्रचंड उत्सुकता आहे. हे कसं ठरलं ते सारं?’ असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “तो सारा काळ वेगळाच होता. आम्ही सत्ताधारी होतो. सारा फोकस आमच्यावर असायचा. अशा परिस्थितीत ‘मिशन’ किंवा ‘ऑपरेशन’ सोपे नव्हते. पण आम्ही भेटायचो, बोलायचो. बोलल्याशिवाय कसं होणार? प्रत्यक्ष भेटी वारंवार व्हायच्या. साताऱ्याला ते कधीच भेटायला आले नव्हते. दूरध्वनीवरून बोलणं शक्यच नव्हतं. कारण आमचे मोबाईल टॅप होत असत”, असा दावा शिंदेंनी केलाय.

दीपक केसरकर ते शंभूराज देसाई… बंडखोरीत दिली साथ, एकनाथ शिंदेंनी अशी केली परतफेड!

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या दिशेने रोख?

एकनाथ शिंदे यांनी मोबाईल टॅपिंगचा दावा केलाय, मात्र त्यांनी कुणाच्या आदेशावरून टॅप केले जात होते, याचा उल्लेख करणं टाळलं. मात्र, या मुलाखतीत शिंदेंचा एकूण रोख उद्धव ठाकरेंवरच असल्याचं दिसतं. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे बंड करणार याची कुणकुण उद्धव ठाकरेंना लागली होती. बंडखोरी झाल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल भाष्य केलं होतं.

    follow whatsapp