Jammu and Kashmir: 2 शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या, दहशतवाद्यांनी 3 दिवसात 5 जणांचां घेतला जीव

मुंबई तक

• 01:00 PM • 07 Oct 2021

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. दहशतवादी आता आपली दहशत दाखवण्यासाठी थेट सामान्य नागरिकांना लक्ष्य करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सामान्य नागरिकांची हत्या करत आहेत. आज (गुरुवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी गेल्या 7 दिवसात 5 नागरिकांचा बळी घेतला आहे. […]

Mumbaitak
follow google news

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. दहशतवादी आता आपली दहशत दाखवण्यासाठी थेट सामान्य नागरिकांना लक्ष्य करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सामान्य नागरिकांची हत्या करत आहेत. आज (गुरुवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी गेल्या 7 दिवसात 5 नागरिकांचा बळी घेतला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ईदगाहच्या संगम परिसरातील शासकीय बॉईज स्कूलमध्ये गोळीबार केला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले दुःख

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले, ‘श्रीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. यावेळी ईदगाह परिसरात असलेल्या सरकारी शाळेच्या दोन शिक्षकांची हत्या. या अमानवी कृत्यासाठी निषेधाचे शब्द पुरेसे नाहीत पण मी मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना करतो.’

या वर्षभरात 25 नागरिकांची करण्यात आली आहे हत्या

आजच्या घटनेचा समावेश करून, दहशतवाद्यांनी या वर्षभरात 25 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. यापैकी तीन परदेशी नागरिक होते. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सर्वाधिक 10 हत्या केल्या आहेत. याशिवाय पुलवामा आणि अनंतनागमध्ये 4, कुलगाममध्ये 3, बारामुल्लामध्ये 2 आणि बडगाम आणि बांदीपोरामध्ये 1-1 हत्या झाल्या आहेत. या वर्षभरात दहशतवाद्यांनी ज्या हत्या केल्या आहेत त्यात 18 मुस्लिम आणि दोन काश्मिरी पंडितांचा समावेश आहे.

मंगळवारीही तीन जणांची करण्यात आली हत्या

दरम्यान मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती. सकाळी दहशतवाद्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात SUMO चे अध्यक्ष नायदखाय मोहम्मद शफी उर्फ ​​सोनू यांची हत्या केली होती. त्यानंतर बिंद्रू मेडिकेटचे मालक माखन लाल यांची इक्बाल पार्कजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पानीपुरी विकणाऱ्या एका रस्त्यावरच्या विक्रेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो बिहारमधील भागलपूरचा रहिवासी होता ज्याचे नाव वीरेंद्र पासवान असे आहे.

Jammu and Kashmir: दहशतवादी मसूद अझहरचा पुतण्या कमांडर लंबू चकमकीत ठार, लष्कराचं मोठं यश

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात आपली दहशत कायम राहावी यासाठी दहशतवादी आता अत्यंत खालच्या पातळीला उतरुन सामान्य लोकांची निर्घृण हत्या करु लागले आहेत. अशावेळी आता देशातील मोदी सरकार हे दहशतवाद्यांना कधी रोखणार असा सवाल सातत्याने केला जात आहे.

    follow whatsapp